दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिशचंद्र’ चित्रपटाच्या एक दशका आधीच ह्या दोन भारतीयांनी भारतीय चित्रपटश्रुष्टीची मुहूर्तमेढ केली होती (These two legends laid the foundation of Indian cinema, starting the Indian cinema industry before Dadasaheb Phalke’s first film, ‘Raja Harishchandra’)
दादासाहेब फाळकेंचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा भाटवडेकर यांच्या पहिल्या चित्रपटा नंतर तब्बल १४ वर्षांनी तर सेन यांच्या ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ ह्या चित्रपटा नंतर १२ वर्षांनी प्रदर्शित झाला आहे. हे दोघेही भारतीय सिनेमाचे जनक (Two Legends of Indian Cinema) मानले जातात.
काय बोलता ! तुम्हाला माहित नाही ह्या दोन दिग्गज चित्रपट बनविणारे ह्यांच्या बद्दल, तर मग चला जाणून घेऊयात ह्या दोन भारतीय सिनेमा जगताचा पाया घालणाऱ्या भारताचे आद्य चित्रपट निर्माते हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर (सवे दादा) आणि हिरालाल सेन ह्यांच्या बद्दल.
सन १८६८ मध्ये दोन भारतीय चित्रपट निर्माणकर्ते भारताच्या नकाशाच्या दोन विरूध दिशेला जन्माला आलीत. यातील पहिले आहेत हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला तर दुसरे आहेत हिरालाल सेन ज्यांचा जन्म त्याकाळी बंगाल मध्ये (सध्याचे बांगलादेश) मध्ये झाला. ह्या दोघांनी आप-आपली चित्रपट निर्मिती केली होती तेही दादासाहेब फाळकेंचा पहिला चित्रपट ‘राजा हरिशचंद्र’ प्रदर्शित होण्याच्या एक दशक भर आधी. चला तर मग जाणून घेऊयात या दोन विस्मरणात गेलेल्या भारतीय चित्रपट-श्रुष्टीचे जनक हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर आणि हिरालाल सेन यांच्या बद्दल.
हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर आणि हिरालाल सेन हे दोघंही एक दुसऱ्याला ओळखत ही नव्हते. दोघेही स्थिर छायाचित्रकार होते आताच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘स्टील फोटोग्राफर’. हरिशचंद्र भाटवडेकर ह्यांचा फोटो केमेराचा व्यवसाय होता व त्यांचे त्याकाळी सन १८८० मध्ये मुंबई म्हणजेच बॉम्बे मध्ये एक स्टुडियो सुद्धा होता. हिरालाल सेन हे प्रसिद्ध वकील यांचे पुत्र होते व त्यांचाही व्यापार व्यवसाय होता. भारतीय चित्रपट निर्मितीसाठी नांदी ठरली ती म्हणजे दिनांक २८ डिसेंबर १८९५ ही तारीख ज्या दिवशी पेरीस शहराच्या एका हॉटेलमध्ये लुमिएरे बांधव यांनी आपल्या १० चित्रपट प्रदर्शित केले होते.
भारतात आला पहिला चलचित्र चित्रित करणारा केमेरा
लुमिएरे बांधव यांच्या साठी काम करणारे मारियस सेस्टियर (Marius Sestier) सन १८९६ मध्ये भारतात आले सोबत चलचित्र बनविणारे जादूचे यंत्र घेऊन, त्याकाळच्या बॉम्बे गेझेट ‘Bombay Gazett’ ह्या इंग्रजी वृत्तपत्राने याची दखल घेऊन लिहिले होते, “शतकातील चमत्कार” (The Marvel of the Century). त्यांनी एक प्रदर्षणिक शो आयोजित केला होता जो दक्षिण मुंबई जवळच्या काला घोडा भागातील वाटसन हॉटेल येथे दाखविण्यात आले होते.
या प्रदर्शनीत एकूण सहा चलचित्रपट (लघुपट) दाखविण्यात आले आणि भारतीयांसाठी हा भारतीय सिनेमाचा उदय होता. वाटसन हॉटेल नंतर नोवेल्टी थियेटर येथे एका आठवड्या नंतर परत हेच सर्व चलचित्रपट (लघुपट) दाखविण्यात आलेत. हे दर आठवड्याला जागा अदलून बदलून काही आठवड्यांसाठी सुरु राहिले.
ह्या सर्व प्रदर्शनी मध्ये हिरालाल सेन हे मुंबईत कुठेही नव्हते, पण त्याच वेळी एक २८ वर्षे वय असलेला तरुण ह्या चलचित्रपट (लघुपट) चा एक प्रेक्षक म्हणून हे विलोभनीय आणि चमत्कारिक गोष्ट अनुभवत होता. ह्या तरुणाचे नाव होते, हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर. भाटवडेकर यांना सवे दादा म्हणून ही ओळखले जात होते, भाटवडेकर यांनी त्याकाळी २१ हजारची गुंतवणूक करून भारतात पहिला चलचित्रपट बनविणारा केमेरा इंग्लंड येथून रीलेय बंधु यांचे कडून आयात केला, आणि हरिशचंद्र भाटवडेकर यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरु झाला.
भारतात बनलेला पहिला चलचित्रपट (लघुपट)
हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर यांनी सन १८९९ मध्ये त्याकाळी प्रसिद्ध असलेले दोन नामी पहिलवान पुंडलिक दादा आणि कृष्णा न्हावी यांचा एक कुश्तीचा सामना आपल्या केमेराने रेकोर्ड केला. हा कुश्तीचा सामना मुंबई येथील मलाबार हिल्स भागातील हेन्गिंग गार्डन येथे रेकॉर्ड करण्यात आला होता. रेकॉर्ड केलेले रिल्स पुढील प्रक्रिया करण्यासाठी परत इंग्लंडला पाठविण्यात आली होती. त्याच वेळी भाटवडेकर यांनी प्रक्रिया केलेली रिल्स दाखविण्यासाठी एक प्रोजेक्टर सुद्धा खरेदी केले होते.
“The Wrestlers” हा भारतात बनलेला पहिला चलचित्रपट आणि हरिशचंद्र भाटवडेकर हे पहिले भारतीय चित्रपट निर्माते बनले होते.
भारतातील पहिली चलचित्रपट बनविणारी कंपनी
हिरालाल सेन हे सुद्धा काही मागे नाही राहिले, सन १८९९ प्रोफेसर स्तेवेनसन यांनी एक चलचित्रपट प्रदर्शित केला जो एका ‘अ फ्लॉवर्स ऑफ पर्शिया’ नाटका बरोबर दाखविण्यात आला. हिरालाल सेन सुद्धा चलचित्रपट व चलचित्रपटचे केमेरा पासून खूप प्रभावित झाले. सेन यांनी प्रोफेसर स्तेवेनसन यांना विनंती करून त्यांचा चलचित्रपट बनविण्याचा केमेरा हाताळू द्यायची परवानगी मिळवली. हिरालाल सेन यांनी ‘अ फ्लॉवर्स ऑफ पर्शिया’ नाटकातील एक नृत्य कलाकृती केमेऱ्यात चित्रित केली.
तदनंतर सन १८९९ मधेच आपल्या वडिलांकडून ५००० रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी एक केमेरा (urban bioscope) लंडन येथून मागविला. आणि मग त्यांच्याच बंधु मोतीलाल सेन यांच्यासोबत भागीदारी करत भारतातील पहिली चित्रपट निर्मिती करणारी कंपनी ‘रॉयल बायोस्कोप’ ची स्थापना केली.
इकडे हरिशचंद्र भाटवडेकर आपला स्वतःचा चित्रपट बनविण्यावर लक्ष केंद्रित करून होते तर तिकडे हिरालाल सेन यांचे प्प्राथमिक लक्ष विदेशातून चलचित्रफित आणून कलकत्त्याच्या क्लासिक थिएतर मध्ये नाटकांच्या मध्यंतरी चित्रपट दाखविण्यावर भर देत होते.
हरिशचंद्र भाटवडेकर हे स्वतः बनविलेली लघु, वास्तवदर्शी आणि आवाज नसलेले चित्रपट बनवून मुंबई मध्ये दाखवत होते. ‘द रेसलर्स’ नंतर त्यांचा पुढील चित्रपट होता ‘अ मेन एन्ड हिस मंकी’ जो सन १८९९ मधेच बनवून प्रदर्शित करण्यात आला. ‘अ मेन एन्ड हिस मंकी’ चित्रपटचे प्रदर्शन त्याकाळच्या बॉम्बे जिमखाना जवळ मादाम कामा मैदानात एका तंबू सारख्या बंदिस्त जागेत दाखवू जाऊ लागले.
हिरालाल सेन यांनी स्वतःचे चित्रपट निर्मिती सन १९०१ साली सुरु केली. क्लासिक थिएतर मध्ये चालणारे नाटकांचे वेगवेगळे भाग त्यांनी चित्रित करायला सुरे केले ज्यात प्रामुख्याने ‘अ फ्लॉवर्स ऑफ पर्शिया’ ह्या नाटकातील काही दृश्य होते. त्यानंतर त्यांनी पहिला जास्त लांबीचा चलचित्रपट चित्रित केला, जे क्लासिक थिएटर मध्ये चालणारे लोकप्रिय नाटक ‘अलिबाबा आणि चाळीसचोर’ (Alibaba and the forty thieves) होते.
हिरालाल सेन क्लासिक थिएटर मधील नाटकातील भाग चित्रित करत होते तर भाटवडेकर खऱ्याखुऱ्या गोष्टी चित्रित करण्यावर भर देत होते. त्याच वेळेस इंग्रज सरकार सुद्धा चलचित्र चित्रित कार्यावर भर देऊ लागले, त्यांना भारतातील त्यांच्या रहिवास आणि सरकारी कामकाजाचे चित्रीकरण करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी नवीन चित्रपट निर्मिती करणारे व इतर गोष्टी चित्रित करणाऱ्यांना, इंग्रज जास्तीत जास्त चित्रित करणारे केमेरा वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होते.
सन १९०१ मध्ये भाटवडेकर यांनी सर एम. एम. भावनगरी आणि आताश बेहराम यांचे आगमनाचे चित्रीकरण केले होते जे एका पारसी मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाबद्दल होते.
सिनेमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही चलचित्र चित्रित करण्यसाठी झाली होती ज्यात एकाधे कार्यक्रम किंवा इतर बाबी चित्रित करणे याचा समावेश होता. प्रेक्षकांचे मनोरंजन व व्यावसायिक चित्रीकरण हे खूप नंतर सुरु झाले. माहितीपट हे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांच्या आधी अस्तित्वात आलेत. भाटवडेकर ‘सवे दादा’ भारतीय वास्तविक व माहितीपट चित्रपटांचे जनक मानले जातात.
पहिला बातमीपट
जेव्हा श्री रघुनाथ परांजपे केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून भारतात मुंबईला सिनियर रेन्ग्लर म्हणून परतले दिवस होता ७ डिसेंबर १९०१. मुंबईतील पेडर रोड वरील नरोत्तम मोरारजी यांच्या बंगल्यावर रघुनाथ परांजपे यांचा भव्य सत्कार ठेवण्यात आला होता. सदर समोरह अत्यंत महत्वपूर्ण होता वत्या समारोहास खूप लोकांनी हजेरी लावली होती, ज्यात होते भाटवडेकर ‘सवे दादा’. भाटवडेकर यांनी तो समारोह चित्रित केला होता, आणि सदर चित्रीकरण पहिला अधिकृत माहितीपट म्हणून स्वीकारला गेला. सोबतच सदर माहितीपट भारतातील पहिले ‘बातमीपट’ सुद्धा ठरले.
दिल्ली दरबारचे चित्रीकरण
सन १९०२-०३ मध्ये इंग्रज गवर्नर लॉर्ड कुरझोन यांना राजा किंग एडवर्ड ७ यांचा राज्याभिषेकचा कार्यक्रम स्थळ दिल्ली दरबारचे चित्रीकरण करावयाचे होते. भाटवडेकर आणि एक अमेरिकन चित्रीकरण करणारे यांनी मिळून दिल्ली दरबार येथील चित्रीकरण लॉर्ड कुरझोन व इंग्रज शासणासाठी पूर्ण केले होते.
सदर दिल्ली दरबारचे चित्रित केलेली चित्रफितीचे काही अवशेष आपणास यूट्यूब वर पहावयास मिळते. सदर चित्रफित दि ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट एंड ब्रिटीश कौन्सिल (The British Film Institute & British Council) यांच्या द्वारे BFI या यूट्यूब चेनलवर दाखविण्यात येते. सदर चित्रफित आपण खाली पाहू शकतात.
हिरालाल सेन सुद्धा दिल्लीदरबारच्या कार्यक्रमाला उपस्थित होते व त्यांनी सुद्धा दिल्ली दरबारचा कार्यक्रम चित्रित केला होता. सेन यांच्या दिल्ली दरबार चित्रीकरणाच्या कामाला खूप प्रशंशा मिळाली होती. हिरालाल सेन यांना त्याच काळात क्षयरोगाचे निदान झाले होते तरीही त्यांनी दिल्ली दरबार कार्यकारामाचे विस्तृतपणे व सविस्तरपणे काम केले होते. सन १९०५ मध्ये सेन यांनी बंगालच्या विभागणी वर आधारित चित्रपटची निर्मिती केली होती. सदरचित्रपट भारतातील पहिला राजकीय माहितीपट म्हणता येऊ शकतो.
सन १९१३ पर्यंत हिरालाल सेन यांनी काही चित्रपट, माहितीपट, बातमीपत व जाहिरातींची निर्मिती केली. पण ढासळत चाललेली प्रकृती व वाढती स्पर्धा मुळे त्यांचे त्यांच्या भावासोबत असलेली भागीदारी व्यवसाय बंद करावा लागला.
हे पण वाचा : भारतीय शेती आणि हरित क्रांतीचा व्यापक इतिहास
दुसरीकडे भाटवडेकरयांनी १९०० दशकाच्या मध्या पर्यंत चित्रपटांची निर्मिती सुरु ठेवली होती. नंतर त्यांनी मुंबईतील एक नामांकित थिएटर खरेदी केले आणि तदनंतर त्यांनी थिएटर चालवण्यावर आणि त्याच्या देखभालीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. त्या थिएटर कडून त्यांना वाजवी दौलत-संपती अर्जित झाली जी त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांना कामात आली.
इकडे सन १९१७ मध्ये २४ ऑक्टोबर रोजी हिरालाल सेन यांचे बंधु मोतीलाल सेन यांच्या घरी जेथे हिरालाल सेन यांची पूर्ण चित्रीकरणाचे यंत्रणा- साधन सामुग्री व चित्रित करून ठेवलेले संपूर्ण साहित्य ठेवले होते, त्याघराला अचानक आग लागली. ज्यात चीत्रीकरणासाठी लागणारे सर्व साहित्य सोबतच तोपर्यंत चित्रित केलेले सर्व माहितीपट, चित्रपट व जाहिराती जळून राख झाल्या. काहीही काम शिल्लक राहिले नाही. ह्याआगीत हिरालाल सेन यांची पुतणी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि फक्त २ दिवसांनी २६ ऑक्टोबर रोजी हिरालाल सेन यांचाही मृत्यू झाला.
आज आपण पाहत असलेले चित्रपट आणि त्यांच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारे केमेरे हे खूप अत्याधुनिक झालेले आहेत. भाटवडेकर आणि सेन यांनी वापरलेल्या केमेऱ्यापेक्षा आजच्या युगातले केमेरे एकदुस्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. पेरीस मधील ग्रेंड केफेच्या तळघरात सुरु होऊन मुंबईतील वातसोन हॉटेल पर्यंत आलेले केमेरे आणि आज सर्व बाबतीत सुसज्ज असलेले केमेरे चीतीकरण आणि कला यांच्या कार्याला रोज एक नव्या शिखरावर नेत आहेत. आजच्या आधुनिक काळात ह्या दोन भारतीय चित्रपटाचे आद्यपुरुष भारतीय चित्रपटांच्या इतिहासातून विस्मरणात गेले आहेत. चित्रपट श्रुष्टीतील लोकही या दोन भारतीय चित्रपटांचे जनक यांना ओळखत नसावीत ही एक शोकांतिका आहे.
एकीकडे हिरालाल सेन यांचे नशीब त्यांना इतिहासातून मिटविते तर दुसरीकडे भाटवडेकर यांचे कार्य पुरेश्या संसाधना अभावी काळाच्या ओघात विलुप्त झालेली आहेत. जर ह्या दोघांचे कार्य व चित्रित केलेली चित्रफिती आज उपलब्ध असते तर ते भारतीय सिनेमा साठी एक मानबिंदू ठरले असते हे नक्की.
पहिला वैशिष्ट्यपूर्ण कथानक सहित भारतीय चित्रपट ठरला तो म्हणजे ‘राजा हरिशचंद्र’ पण खरंच तो पहिला भारतीय चित्रपट होता?. ‘राजा हरिशचंद्र’ भाटवडेकर यानी चलचित्र चित्रीकरण करणारा केमेरा वापरल्या नंतर व ‘द रेसलर’ ह्या त्यांच्या पहिल्या चलचित्रपट (लघुपट) प्रदर्शित झाल्यावर तब्बल १४ वर्षानंतर प्रदर्शित झाला होता. तर हिरालाल सेन यांच्या ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ ह्या लांबीचा चलचित्रपट प्रद्दर्शीत झाल्यानंतर एक तप म्हणजेच तब्बल १२ वर्षांनी भारतीय प्रेक्षकांच्या समोर प्रस्तुत झाला होता.
अश्या विस्मरणात गेलेल्या दोन भारतीय सिनेमाचे जनक व आद्यपुरुष हरिशचंद्र सखाराम भाटवडेकर व हिरालाल सेन यांच्या स्मृतीस आम्ही अभिवादन करतो.
Pingback: भारतीय शेती आणि हरित क्रांतीचा व्यापक इतिहास - काय बोलता !